पहिली कविता

प हि ली क वि ता जुलमी सत्ताधीश आतपी, लुटून नेई अवघी अवनी अश्रू सुकुनी गालावरती कोमेजुन मुखमंडल जाई --- ।। 1 ( आतपी – सूर्य, अवनी- पृथ्वी ) मरुद्गणांची साथ रवीसी लुटण्या वैभव धनसम्पत्ती धुळीत माखुन गेली अवघी वसुंधरा ती अती लाघवी --- ।। 2 निराधार त्या वसुंधरेसी उरे न त्राता जगती कोणी कढ दुःखाचे गिळता गिळता हृदय विदीर्ण शतखंडच होई --- ।। 3 आक्रमणाने पीडित वंचित अबोल झाली; खिन्न तिचे मन धरणी टाकी उष्ण उसासे सर्पिण जखमी जशी फुसफुसे --- ।। 4 विष भरल्या त्या उच्छ्वासांनी मरणाचे थैमान भोवती दुःखी होती मुले माणसे, पशू पक्षि द्रुम-लताचि खासे --- ।। 5 अभाग्यास ना पुसे कुणीही त्यजति जळत्या तरुसी द्विजही दारिद्र्याचा येता फेरा चुकविति त्याला जिवलग साथी --- ।। 6 अवचित येई झुळुक सानुली घाली फुंकर जखमेवरती ‘‘मरणानंतर दुजे मरण ना’’ देई विश्वासाने ग्वाही --- ।। 7 ‘‘उरे न काही जेव्हा लुटण्या भय लुटण्याचे कशास चित्ता गळून पडता ...